#पृथ्वीचे_शोकगीत #वसुंधरा_गीत #हा_नाश_थांबवा- तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक,

Wednesday 5 June 2019

जीवन गौरव दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन नाशिक- २०१९


जीवन गौरव दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन नाशिक- २०१९ 

     ५ जूनला नाशिक येथे जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य व रामशेज शिक्षण संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिन व रामशेज शिक्षण संस्था रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित जीवन गौरव दुसरे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन नाशिक- २०१९ मध्ये प्रथमच "कविकट्टा" रंगला. 
      मा.पितामह हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनामध्ये सर्व सहभागींना आकर्षक सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व विशेषांक देऊन गौरविले. 

     जीवनगौरवने साहित्यिकांना व्यासपीठ मिळून मिळवून दिल्याबद्ददल जीवन गौरवचे मनःपूर्वक आभार..

कविता सादरीकरण...
🎯 शब्द..!

कुरवाळिसी मायेने, प्रेम दाविती शब्द !
बाळ बने नटखट, लाडिक बनती शब्द !!

काढी वाभाडे सहज, परखड असे हे सत्य !
धार चढती जर शब्दांना, मन दुखविती शब्द !!

समज असे जर शब्दांत, घरे बनती स्वर्ग !
खेळ मांडीती घरांत, गुंता वाढवी शब्द !!

ध्येय असे जर शब्दांत, घडवी इतिहास स्तुत्य !
कौतुकाचे बीज पेरता, भविष्य बनवी शब्द !!

असे सामर्थ्य पराकोटीचे, करी सन्मान नित्य !
क्रोध होई अनावर, शस्त्र बनती शब्द !!



शिक्षण तज्ञ मा.भाऊसाहेब चासकर, जयदीप दादा व विजया ताई यांच्यासमवेत

असेन मी...नसेन मी... अक्षरी उरेन मी....


-----------------------------------------------

गुरूमाऊली कविकट्टा

प्रमुख उपस्थिती
मा. राजन लाखे(कविकट्टा प्रमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१६,१७,१८)
मा. उत्तम कांबळे    मा.शिवराम बोडके
(संमेलनाध्यक्ष)             (स्वागताध्यक्ष)
मा. हरिदास कोष्टी   मा.दीपक अमोलिक
(कविसंमेलनाध्यक्ष)        (कविकट्टा प्रमुख)
मा. रामदास वाघमारे (प्रमुख संपादक) 
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य
मा. दिगंबर शिंदे(पुणे जिल्हा सहसंपादक)
समन्वयक: मा. मिरा वाघमारे, मा. संदीप सोनवणे, मा. निरूपा बेंडे व सर्व जीवन गौरव 
परिवार 
आयोजक
सौ. रूपाली बोडके सौ. वैशाली भामरे
नाशिक जिल्हा सहसंपादक
जीवन गौरव मासिक महाराष्ट्र राज्य








शिक्षकाकडून आणि साहित्यिकांच्या साहित्यातूच समाजात बदल होणे शक्य - उत्तम कांबळे 




औरंगाबाद / प्रतिनिधी 
      शिक्षकच समाजात ख-या अर्थाने चांगला बदल घडवून आणू शकतो. त्यामुळे शिक्षकाला साहित्याची जाण असणे महत्वाचे आहे असे मत दुस-या राज्यस्तरीय शिक्षक जीवन गौरव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  साहित्यिक उत्तम कांबळे यांनी मांडले.यावेळी विचारमंचावर स्वागताध्यक्ष शिवराम बोडखे, माजी संमेलनाध्यक्ष राजन लाखे ,पुणे जिल्हा संपादक डी.बी. शिंदे,  जीवन गौरव मासिक चे मुख्य संपादक रामदास वाघमारे, संपादक कल्याण अन्नपुर्णे, मु.अ. संदिप सोनवणे, वंदना सलवदे, आयोजक रूपाली बोडके, वैशाली भामरे,सरपंच जिजाबाई तांदळे,गावातील जेष्ठ नागरिक यांचेसह राज्यातील साहित्यिक, कवी, शिक्षक , जीवन गौरवचे सहसंपादक मोठया संख्येने उपस्थित होते. 
       जीवन गौरव मासिक  महाराष्ट्र राज्य व रामशेज हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाची साक्ष देणा-या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात दुसरे राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य व कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.  यावेळी संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे पुढे बोलताना म्हणाले की, साहित्य हे माणसाला घडवत असते. जीवन सुंदर करण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि स्फूर्ती देत असते. जुने साहित्य हे परंपरावादी असून ते मानवी जीवनात हवे तेवढे बदल करण्यास कारणीभूत ठरत नाही. ते साहित्य धर्म, जात, कर्मकांड, अंधश्रद्धा, रुढीपंरपरा, यामध्येच अडकले होते. स्वातंत्र्यानंतर फार बदल झाले. लोकशाही मूल्य आली. त्यामुळे समाजात फार बदल झाले. त्या साहित्यात माणुस केंद्रस्थानी आणला. माणसाला महत्व दिले. कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, बाबुराव बागूल यांनीही देव, धर्म जात यापेक्षा माणूसच श्रेष्ठ आहे हे ठणकावून सांगितले हे शिक्षकाने लक्षात ठेवायला हवे. त्यादृष्टीने साहित्य निर्माण व्हायला हवे. त्या खरेपणासाठी साहित्यिकाने साहित्यातून आपली भूमिका स्पष्ट मांडली पाहिजे. शिक्षक सतत जागरूक असला पाहिजे. तोच ख-या अर्थाने समाजात बदल घडवून आणू शकतो. यावेळी माझी संमेलनाध्यक्ष राजन लाखे यांनी मराठी भाषेसंबंधी व साहित्यासंबधी आपले मत मांडले. यावेळी संपादक रामदास वाघमारे यांनीही जीवन गौरव साहित्य संमलन घेऊन अनेकांना लिहितं, बोलतं करणे, समाजात लेखनीच्या माध्यमातून, शिक्षकाच्या हातून बदल घडवून आणणे हाच जीवन गौरव साहित्य संमेलन घेण्यामागचा उद्देश आहे असे सांगितले. संमेनाची सुरुवात ग्रंथदिंडीने संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष शिवराम बोडके, संपादक रामदास वाघमारे, डी. बी. शिंदे, आयोजक रूपाली बोडखे व वैशाली भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उद्घाटनानंतर प्रा. डॉ. सतीश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात डॉ. रत्ना चौधरी, वेच्या गावित व भाऊसाहेब चासकर आदि उपस्थित होते. त्यानंतर मुख्य सभामंडपात हरिदास कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अनेक कविंनी कविता सादर केल्या. यावेळी उपसंपादक मीरा वाघमारे, संदीप सोनवणे, संतोष दातीर, कुणाल पवार, प्रा. अशोक डोळस, गीता केदारे, आदिंनी मार्गदर्शन केले. तर दुस-या हॉलमध्ये कविकट्टा डी. बी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याध्येही महाराष्ट्रातून आलेल्या विविध कविंनी कविता सादर केल्या. यासाठी दिपक अमोलिक, योगिनी कोठेकर, सीमा गांधी आदिंनी मदत केली. 
संमेलन स्थळी पुस्तकाचे विविध स्टॉल व  जेवनात आमरस, मांडे, कुडNयाचे खास आकर्षण ठरले , शेवटी प्रा.सतिश म्हस्के व संदिप ढाकणे यांनी सुत्रसंचलन केले. तर आभार संमेलन आयोजक रुपाली बोडके यांनी मानले.

    नंदुरबारला होणार तीसरे राज्यस्तरीय जीवन गौरव साहित्य संमेलन
     जीवन गौरव मासिक, औरंगाबाद च्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक साहित्य संमेलन घेण्यात येते. शिक्षकांच्या अंगी असणाNया सुप्त कलागुणांना वाव मिळावा, लेखनाचे कौशल्य निर्माण व्हावे म्हणून अनेक नवनवीन शिक्षकांना साहित्य प्रवाहात आणण्याचे काम हे मासिक करते.  २०२० मध्ये घेण्यात येणारे तिसरे जीवन गौरव राज्यस्तरीय साहित्य संमेलन नंदुरबार येथे घेण्याचे ठरले आहे. हे संमेलन व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी नंदुरबार येथील दिनेश वाडेकर व पिंपळनेर येथील प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी घेतली आहे. नुकत्याच नाशिक येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात फिरता चषक दिनेश वाडेकर व प्रा. डॉ. सतीश मस्के यांना संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, संपादक रामदास वाघमारे, हरिदास कोष्टी, रूपाली बोडखे, वैशाली भामरे, संतोष दातीर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन घेण्यात येणार आहे. यामध्ये नंदुरबार वासियांना यामध्ये सहभागी होता येईल. त्याचबरोबर नंदुरबार वासियांना ज्ञानाची मेजवानीही मिळणार आहे.

 (c/p)


संयोजकांचे मनःपूर्वक आभार.....

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार !!!

Follow me to get updates.

Recent Posts Widget
snow effect